Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. आंदोलन स्थळी संदिपान घुमरे, अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे आले आहेत. संभाजी भिडे यांना आंदोलन स्थळी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही,, शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे. जसं पाहिजे तसं, आरक्षण मिळालं पाहिजे,, असं संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले. ते आंतरवाली सराटी येथे आले आहेत. उपोषण थांबवा,, लढा थांबवू नका, असं संभाजी भिडे म्हणाले.
Manoj Jarange : “आरक्षणाचा प्रश्न राजकारण्यांच्या हातात आहे.
आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.आता मागे वळून पाहायचं नाही” अस संभाजी भिडे म्हणाले. “आरक्षण मुळवूनच या लढ्याचा शेवट झाला पाहिजे. उपोषण मागे घ्या,असं सरकारच्या वतीने जरांगे पाटलांना विंनंती करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माघार घायची नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
हे ही वाचा : Manoj Jarange Patil | ‘मी समाजाला शब्द दिलाय, माझी अंतयात्रा तरी निघेल नाहीतर..’; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम.
मी इथे दिखाव्यासाठी आलेलो नाही. तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. मराठा समाजाला पाहिजे तस आरक्षण मिळायला हवं” जे करता येते 101% योग्य आहे. राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे. एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, जे सध्या सत्तेवर आहेत, ते अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत, फडणवीस बेईमानी करणार नाहीत” असं संभाजी भिडे म्हणाले.
” आपण हे आंदोलन जीवाच्या आकांताने चालवताय. कौतुक करावं एवढं चांगलं आंदोलन आहे. मी तुम्हाला उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताय ती ,धर्माची समाजसेवा आहे. या तपश्चर्याचे फळ नक्की मिळणार. राजकारणी आहेत, म्हणून मनात बिचकु नका. जो शब्द देतील, तो पाळून घ्यायचं काम माझ्यावर सोडा. ही लढाई एक घावदोन तुकडे अशी नाही.
Manoj Jarange : आग्रह आहे ज्या जे सत्य आहे त्या बाजूने लढाई यशस्वी होणार. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. मराठा समाज हा हिंदुस्थानाच्या पाठीचा कणा , आत्मा असलेला समाज आहे. उपोषण थांबवा लढा थांबू नका” असं आवाहन संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं.